दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.यात, कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत दरवर्षी 25 मुला-मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय इतरही काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही उपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय -
घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.
शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय.
करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय.
