पत्रकारांच्या वाहना बाबत पत्रकार सुरक्षा समिती च्या निवेदनाची दखल, लवकरच होणार टोल मुक्ती चा निर्णय होणार ; यशवंत पवार यांची माहिती

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासना च्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चार चाकी वाहनातून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यायल जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार कॅबिनेटमंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चार चाकी वाहनाने यावं लागत आहे ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चार चाकी वाहने असल्याने नेहमीच सोलापूर ला वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागतं आहे शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोल चा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवाना सहन करावा लागत आहे या बाबत मा जिल्हाधिकारी साहेबांनी सोलापूर जिल्ह्यातील चार चाकी वाहन घेऊन वार्ताकंन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळा ने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिनांक 16/7/2025 रोजी निवेदन सादर केलं होते या निवेदना ची सोलापूर च्या जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली असून पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून सूट देणे बाबत कार्यकारी अभियंता भारतीय राष्ट्रीय महामार्ग सोलापूर (NHAI) यांना पत्र पाठवले असून लवकरच पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला टोल मधून सूट मिळणार असल्याचे माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी माध्यमाना दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form