जनता संघर्ष न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 


सोलापूर (प्रतिनिधी) - दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सोलापूरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात जनता संघर्ष न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमास श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे, माजी महापौर तथा ज्येष्ठ लेखिका नसीमा पठाण, दैनिक एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, पर्यावरण दूत मनोज देवकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आयोजक सिद्धार्थ भडकुंबे यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर आधारित गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली.प्रास्ताविकातून सिद्धार्थ भडकुंबे यांनी चॅनलचा दोन वर्षांचा प्रवास मांडला. यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी व्यक्तींचा सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प व रोप देऊन गौरव करण्यात आला.

गौरवित मान्यवरांमध्ये - 

युवा उद्योजक शिवानंद हतुरे

आदर्श सरपंच लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी

आदर्श पत्रकार इकबाल शेख

समाजसेवक अशपाक शेख सर

समाजसेवक आप्पासाहेब लंगोटे

आदर्श विमा प्रतिनिधी सचिन जोकारे

संगीत रत्न मयूर स्वामी

समाजसेवा दत्तात्रय छत्रे 

आदर्श शिक्षक मल्लिकार्जुन देशमुख सर

समाजसेवक, सर्पमित्र अनिल आलदर

आदर्श बँक व्यवस्थापक यल्लाप्पा वग्गे

समाजसेविका उमा अकोल कर-माळी

युवा पत्रकार ज्ञानेश्वर पाटील (पुणे)

आदर्श शिक्षक जब्बार शिकलगार

आदर्श अभियंता विजयकुमार चव्हाण (ठाणे)

माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीकांत कोळी

आरोग्यसेवा डॉ. कीर्ती गोळवलकर

युवा उद्योजक यश खेडे

वैद्यकीय सेवा डॉ. निखिल क्षीरसागर

आदर्श महावितरण अभियंता मेगा शिवगुंडे

आदर्श मुख्याध्यापक औदुंबर बंडगर

समाजसेवा गंगाधर आप्पा पुजारी (तेलगाव)

कार्यक्रमादरम्यान गुरववाडीचे सुपुत्र व हैदराबाद येथे कार्यरत सॉफ्टवेअर इंजिनियर राहुल माळप्पा पुजारी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.समारोपावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाध्यक्ष महेशजी इंगळे म्हणाले की, “जनता संघर्ष न्यूजने वंचित व पीडित घटकांवरील अन्याय-अत्याचारास आवाज देऊन न्याय मिळवून देण्याचे काम सातत्याने केले आहे. स्थानिक कलावंतांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हीही चॅनलची उल्लेखनीय सेवा आहे.”यावेळी संजय येऊलकर, नसीमा पठाण, मनोज देवकर यांनीही चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला संपादक अनिल शिराळकर, श्रीशैल चिंचोळकर, निर्मला गुरव, नितीन करजोळे, सिताराम गायकवाड,अक्षय बबलाद, कीर्तीपाल गायकवाड, संतोष मुगळी, माणिकप्रभू शिंदे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व सामाजिक व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर आभार आशा सुतकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form